दि. 28.11.2025 रोजी शासकीय आश्रमशाळा दहेल येथे महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महात्मा जोतीराव फुले यांचा खालील मुलमंत्राचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला.
"विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले."
दि.28.11.2025 रोजी शासकीय आश्रमशाळा दहेल येथे श्री अरविंद वळवी साहेब यांनी आकस्मिक भेट दिली व शाळा, वसतिगृह, वर्गावर प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला व सर्व कर्मचाऱ्यांची सभा घेऊन मार्गदर्शन केले. एकत्रित रित्या शालेय परिसर, स्वच्छतागृह ,स्वयंपाकगृह ,कोठीगृह यांची तपासणी करून समाधान व्यक्त केले.